लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारने एक सुधारित नियमावली प्रसिद्ध केली - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारने एक सुधारित नियमावली प्रसिद्ध केली

लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारने एक सुधारित नियमावली प्रसिद्ध केली                                
मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले गेले आहेत.किरकोळ निर्बंध लागू करुन कोरोना आटोक्यात येत नसल्याने आता राज्य सरकारने एक सुधारित
नियमावली प्रसिद्ध केली आहे.या नियमावलीत राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.तसेच या अत्यावश्यक सेवा सोडून आता दुसरे
काहीही सुरू ठेवता येणार नसल्याचे जाहीर केले
गेले आहे.अत्यावश्यक सेवांमध्ये पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने,
सर्व प्रकारच्या का्गो सेवा - डेटा सेंटर, क्लाऊड स्व्हिस प्रोव्हायडर्स,आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित सुविधा व सेवा- शासकीय व खासगी
सुरक्षा सेवा फळविक्रेते तसेच खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, त्यात काम करणाच्या कर्मचार्यांचे लसीकरण करावे लागणार असून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर 15 दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल.
10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणार्या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंड घेण्यात येणार आहे.
सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग
कॉर्पोरेशन्स रिझव्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था,प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल ,एनपीसीआय,पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,
सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,सर्व मायक्रो फायनान्स संस्था सर्व वकिलांची कार्यालये
कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी
मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी /
जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)
ज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे,
बसेस, विमानं यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत
स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल. औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या
आधारे रात्री 8 तर सकाळी 7 या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल.एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.परीक्षा देणार्या विद्यार्थ्यास रात्री 8 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल.घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक,स्वयंपाकी यांच्या रात्री 8 नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.

No comments:

Post a Comment