स्मशानभूमीत पत्रा शेड न केल्यास रासप करणार आंदोलन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 15, 2021

स्मशानभूमीत पत्रा शेड न केल्यास रासप करणार आंदोलन

बारामती:-काल राञी जळोची परिसरात पाऊस झाला, जळोची स्मशानातभुमीत कोरोना ने मयत झालेल्या प्रेताचे अंत्यसंस्कार केले जातात,आता पावसाळ्याचे दिवस आहेत हा विधी उघड्यावरती केला जातो, त्यामुळे प्रेत जाळल्या नंतर कदाचीत राञी सारखा पाऊस आला तर प्रेत हे अर्धवट जळाले जाईल, प्रेत जर अर्धवट जळाले तर त्याची विटंबना देखील होऊ शकते.. गेले कित्येक दिवस झाले ही स्मशानभुमीची तजवीज करावी याची मागणी करीत आहोत परंतु प्रशासन जाणुन बुजून या कडे दुर्लक्ष करत आहे, लवकरात लवकर प्रशासनाने या ठीकाणी अथवा इतर ठीकाणी वर पञा शेड मारून व्यवस्था करावी अन्यथा राष्ट्रीय समाजा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा तालुका अध्यक्ष ऍड अमोल सातकर यांनी केला.

No comments:

Post a Comment