तीन दिवसात दोन बालविवाह रोखलेमहिला व बाल विकास विभाग व पोलिस यंत्रणेच्या तत्परतेमुळे यश.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

तीन दिवसात दोन बालविवाह रोखलेमहिला व बाल विकास विभाग व पोलिस यंत्रणेच्या तत्परतेमुळे यश..

तीन दिवसात दोन बालविवाह रोखले
महिला व बाल विकास विभाग व पोलिस यंत्रणेच्या तत्परतेमुळे यश..
जुन्नर:- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे श्रीम. आश्विनी कांबळे , जिल्हा बाल संरक्षण
कक्षातील जिल्हा बाल रांरक्षण अधिकारी श्री परम आनंद यांच्या मागर्दशना खाली रांरक्षण अधिकारी श्री. अक्षय साळुंखे, अभय केंद्र संरक्षण अधिकारी कार्यालय जुन्नर यांच्या व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या तत्परतेमुळे मारगील तीन दिवसात जुन्नर तालुक्यात दोन बालविवाह रोखण्यात यश प्राप्त
झाले आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार विवाहा करिता वयाची मर्यादा घालुन् देण्यात आली आहे त्यानुसार विवाहा करिता मुलाचे वय २१ मुलीचे वय १८ या कायद्याने ठरवण्यात आले आहे .दिनांक २८/५/२०२१ रोजी बेल्हे ता. जुन्नर येथे एका मंगल कार्यालया मध्ये १७ वर्षीय अल्पव्यीन गुलीचा बालविवाह होणार असल्याची गाहिती त्याच दिवशी जिल्हा गहिला व बाल विकास अधिकारी कार्यलय पुणे यांना मिळाली त्यानंतर यांच्या मार्गदर्शनाखाली अभय केंद्र संरक्षण अधिकारी कार्यालय जुन्नर व ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनो आळेफ़ाटा पोलिस प्रशासनाव्या सहकार्याने बालविवाह थांबवण्यात यश प्राप्त झाले त्यांचबरोबर मंगल कार्यालयास स्थनिक प्रशासनांकडुन ५ हजार रुपयांचा दंड हि ठोठावण्यात आला आहे.दिनांक ३१/०५/२०२१ रोजी हि चाईल्ड लाईन मार्फ़त जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यलय पुणे यांना एका १७ वर्षीय अल्पव्यीन मुलीचा बालविवाह निर्गीरी ता. जुन्नर येथे सकाळी ९.१० वाजता होणार असल्याची माहिती त्याच दिवशी सकाळी प्राप्त झाली त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यलय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अभय केंद्र संरक्षण अधिकारी कार्यालय जून्नर व स्थनिक ग्रामसेबक तथा बालबिबाह प्रतिबंधक अधिकारी यांनी जून्नर पोलिस प्रशासानाच्या राहकार्याने ठिक ९ वाजता विवाहरथळी पोहचुन बाल बिवाह थांबवण्यात आला.असे बालविवाह रोखुन मुलींच्या पालकांचे समुपदेशन केले व वय पूर्ण
झाल्याशिवाय विवाह करणार नाही असे हमीपत्र हि लिहुन घेण्यात आले व सर्वाना आवाहन करण्यात आले कि बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे असे बालविवाह करु नये व आपल्या आसपास गावात असे बालविवाह होत असतील तर सामाजिक उत्तरदायीत्व समजुन आमच्या १०९८ या चाईल्ड लाईन वर संपर्क करावा व बालविवाह रोखण्यात प्रशासनाला मदत करावी

No comments:

Post a Comment