*निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 18, 2022

*निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*

*निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
      बारामती (प्रतिनिधी):- युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी मिशनच्या वतीने मानव एकता दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. 
    यावर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन अध्यक्षतेखाली रविवारी (२४ एप्रिल) सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत येथील संत निरंकारी भवनात विशाल रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात  मिशनचे भाविक भक्तगण मोठ्या उत्साहाने भाग घेतील. 
    रक्त संकलित करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीची रक्तपिढी बारामती यांची टीम उपस्थित राहणार आहे.
       या दिवशी संपूर्ण भारतात २६५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे ज्यामध्ये सुमारे ४००० ते ५०००० युनिट रक्त संकलित होईल अशी अपेक्षा सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी व्यक्त केली. 
   सदर शिबीर बारामती शाखेच्या वतीने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाणार आहे. ही उपयुक्त माहिती संत निरंकारी मंडळ बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक यांनी दिली. त्यांनी असेही सांगितले की रक्तदान शिबिरांच्या दरम्यान प्रशासनाकडून देण्यात आलेले कोविड -19 चे निर्देश लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.
      युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी नेहमीच समाज कल्याण कार्यांच्या प्रति निरंतर प्रयासरत  राहिले. त्यांनी एका बाजूला सत्याचा बोध करून मानवमात्राला सर्व प्रकारच्या भ्रमातून मुक्त केले तर दुसऱ्या बाजूला नशाबंदी व साधे विवाह यासारख्या सामाजिक सुधारणांचा पाया घातला. त्यांनी मिशनचा संदेश केवळ भारतातच नव्हे तर विदेशांमध्येही पसरविला. परिणामी आज विश्वभरात ६० पेक्षा अधिक देशांमध्ये मिशनच्या शेकडो शाखा स्थापन झालेल्या आहेत ज्यांच्या माध्यमातून सत्य, प्रेम व मानवतेचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविला जात आहे. बाबा गुरुबचन सिंह जी यांनी युवावर्गाच्या ऊर्जेला नवा आयाम देण्यासाठी त्यांना सदैव खेळांसाठी प्रेरित केले जेणेकरून त्यांची ऊर्जा उपयुक्त दिशेला लागेल आणि देश व समाजाची सुंदर निर्मिती होऊ शकेल.
     मिशनच्या भक्तांसाठी निष्काम सेवा भावनेने केले जाणारे रक्तदान हे आधीपासूनच जनकल्याणाचे एक अभिन्न अंग बनुन राहिले आहे. युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांचे कथन 'रक्त नाड्यानमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको' हा संदेश मिशनच्या अनुयायांनी निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.या विशाल रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची उचित व्यवस्था केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment